Thursday, April 11, 2019

सर्वाधिक निवडणुका जिंकणारा अवलिया : कहांडोळे
मालेगाव मतदार संघाचा इतिहास देतो साक्ष

जिल्ह्यातील मालेगाव अथवा दिंडोरी मतदार संघ आणि नाशिक मतदार संघातून आजतागायत अनेक उमेद्वारांनी आपापली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आजपर्यंतच्या इतिहासात अनेकांनी आपली छाप पाडली आणि राजकारणातील आपापल्या स्वतंत्र हातोटीसाठी नावलौकिकही मिळविला आहे. त्यापैकीच एक म्हणजे झेड. एम. कहांडोळे अर्थात झामरु मंगळु कहांडोळे. या अवलियाने सर्वाधिक निवडणुका लढवून बहुमताने जिंकण्याचा बहुमान मिळविला. मालेगाव मतदार संघाचा इतिहास कहांडोळे यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघापैकी कहांडोळे यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ राजकीय वर्तुळात घालविला. कहांडोळे यांनी सन 1967 पासून ते 1999 पर्यंतचा काळ राजकीय क्षेत्रात घालविला. या काळात त्यांनी 8 वेळा उमेद्वारी स्विकारुन तब्बल 5 वेळा विजय मिळविलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक निवडणुका जिंकणारा आणि सलग खासदार राहिलेला नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विजयही मिळविला.
कहांडोळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे 32 वर्षांचा राजकीय काळ गाजवत असताना भारतीय राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. सुरुवातीपासून मालेगाव (अनु.जमाती) मतदार संघातून भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेद्वारी मिळवत त्यांनी निवडणुका लढविल्या. याचा त्यांना फायदाच झाला.
झामरु मंगळु कहांडोळे यांनी राजकारणात पदार्पण केल्यापासून 1967, 1971, 1977, 1980, 1984, 1991, 1996, 1998 अशा सर्व लोकसभा निवडणुका लढविल्या. पैकी 1977,1984 आणि 1996 या तिनच निवडणुकांत पराभव पाहिला. अन्यथा विजयच अनुभवला.

दणदणीत पराभवानंतरही विजय
 झेड. एम. कहांडोळे यांनी विविध निवडुकांमध्ये विविध प्रकारे उमेद्वारी करीत प्रसंगी पराभवही पचविले आहेत. त्यांच्या ठसठशीत पराभव सांगणारी लोकसभा निवडणूक म्हणजे सन 1984 ची. यावेळी कहांडोळे यांना 2.9 टक्के मतांवर पराभव स्विकारावा लागला. त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात कमी मते पडलेली ही लोकसभा निवडणूक ठरली. यावेळी झामरु कहांडोळे यांची राजकीय लोकप्रियता ढासाळल्याचे दिसते. राजकीय लोकप्रियता फार घटली परंतु विजयाचा ध्वज यावेळीही शेवटाला गेलेला नाही. या निवडणुकीत त्यांचे स्थान तृतीय क्रमांकावर राहिले.
1984 च्या निवडणुकीत सिताराम भोये आणि हरीभाऊ महाले यांच्यात चुरशीची लढत झाली. भोये 52.68 टक्के मतांनी विजयी ठरले तर 42. 72 टक्के मतांनी हरीभाऊ महाले पराभूत झाले. तर अवघ्या 2.09 मतांवर कहांडोळे तृतीय क्रमांकावर राहिले. सर्वात मोठा पराभव पचवून लागलीच पुढील निवडणुकांच्या तयारीस लागले. आपली राजकीय समीकरणे आखत झामरु कहांडोळे यांनी लगेचच 1991 च्या पुढील लोकसभा निवडणुकीत 48.07 टक्के मतांनी दणदणीत विजयही पटकावला.

सर्वाधिक वेळा खासदार राहिलेला नेता
सर्वाधिक निवडणुका लढविणार्‍या उमेद्वारांमध्ये तत्कालीन मालेगाव मतदारसंघातील उमेद्वार हरीभाऊ महाले आणि झामरु कहांडोळे यांचा नंबर लागतो. हरीभाऊंनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूका लढविणार्‍या उमेदवारांमद्ये सर्वाधिक वेळा निवडणूका लढविणारा उमेद्वार म्हणून ओळख प्राप्त केली. मात्र कहांडोळे यांनी सर्वाधिक निवडणुका लढविण्याबरोबरच त्या जिंकण्याचा बहुमानही मिळविला. जिल्ह्यातील ‘सर्वाधिक वेळा खासदारकी मिळविलेला नेता‘ अशी त्यांची ओळख.

सलग दोनदा खासदार राहिलेला नेता
जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदार संघात ‘दोन वेळा खासदार निवडून येत नाही‘ असे स्टेटमेंट सर्वसामान्यपणे ऐकायला मिळते. मात्र त्याबाबत वास्तव काही वेगळेच आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात सलग दोनदा निवडून आलेला खासदार म्हणजे भानुदास कवडे. तर, मालेगाव लोकसभा मतदारसंघात सलग निवडून आलेल्या खासदारांची संख्या 3 इतकी आहे. सन 1967 व 1971 मध्ये ‘सलग दोनदा‘ निवडून आले. त्यानंतर सन 1991, 1998 आणि 1980 मध्ये देखील ते खासदार राहिले.

तृप्ती कानडे - शुक्ल

No comments:

Post a Comment